शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान काय करताहेत? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:57 IST

दुधगाव : देशात ललित मोदी ने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्या ने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँके स ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी ...

ठळक मुद्देकवठेपिरानला विविध विकासकामांचा प्रारंभ; मारुती माने यांच्या स्मारकासाठी तातडीने निधी मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

दुधगाव : देशात ललित मोदीने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्याने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी काय करीत आहेत? असा सवाल माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केला. हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या स्मारकास तातडीने निधी देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. पाटील यांच्या स्थानिक निधीतून कवठेपिरान (ता. मिरज) येथील हाळ भाग व स्मारक रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नामफलकाचे व युवक राष्ट्रवादीने आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटनही झाले. यावेळी आ. पाटील यांनी मारुती माने यांच्या स्मारकास भेट देऊन पाहणी केली. या संयुक्त समारंभात ते बोलत होते.

सरपंच सोनाताई गायकवाड, माजी उपसभापती दत्ता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, मोदी यांनी प्रभावी भाषणे करून लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचा झंझावात पाहताना वाटायचे, आता यांची सत्ता २०-२५ वर्षे तरी हलणार नाही. मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.दत्ता पाटील म्हणाले, आ. पाटील यांनी सत्ता असताना आपल्या गावाला मोठा निधी देऊन गावाच्या विकासाला गती दिली आहे. विनोद वडगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नाजू पाटील, सर्जेराव पाटील, आण्णासाहेब तामगावे, बाळासाहेब केरीपाळे, रावसाहेब कोरे, अतुल पाटील, ऋषिकेश पाटील, अमित चौगुले, संग्राम चव्हाण, सुनील पाटील, अक्षय पाटील, राजरत्न कांबळे, सागर चौगुले उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडेलराज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करू शकते. जनतेने पाच वर्षात भरपूर भोगले असल्यामुळे ती भुलणार नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही स्पष्ट केले.